राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातील वाद पेटलेला असताना आता भाजपमधली अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मुंबईचे भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्षांनी आपला पदाचा राजीनामा देत त्यांनी आमदार अतुल भातखळकर यांच्यावर चुकीच्या वागणुकीचा आरोप केला आहे. मुंबई भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली आहे. मुंबईचे भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष आशुतोष ठाकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, होय, माझ्यासाठी तुम्ही सर्वोच्च आहात. पक्षाशी माझी निष्ठा नेहमीच राहील. पण मी दिलेल्या कारणांमुळे भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई उपाध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. अतुल भातखळकर जी यांच्या कार्यालयात आज जे घडले ते निंदनीय आहे! या राजीनामा पत्रात आशुतोष यांनी आमदार अतुल भातखळकर यांच्या चुकीच्या वागणुकीचाही आरोप केला आहे. आशुतोष हे जेव्हा भातखळकर यांच्या कार्यालयात गेले त्यावेळी घडलेला सर्व प्रकार त्यांनी आपल्या पत्रात लिहिला आहे
तसेच मी गुजराती आहे म्हणून माझा अपमान केला आहे, असे त्यांनी राजीनामा पत्रात मुंबईचे विद्यमान अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना सवाल केला आहे. आशुतोष ठाकर यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये गुजराती विरुद्ध मराठी अशी अंतर्गत गटबाजी सुरु असल्याचं चव्हाट्यावर आलं आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार भाजपा पक्ष नेतृत्व यावे काय प्रतिरकीय देणार हे पाहावे लागणार आहे.
https://twitter.com/ashutoshthakar_/status/1430873884929052687?