मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावरून टीका केली. याच पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते आणि आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ बोलत असताना त्यांनी बाळसाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, ‘स्वतः बाळासाहेब ठाकरे बोलले होते, भुजबळ जर गेले नसते तर ते शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले असते. त्यावेळेस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री झालो असतो.
‘
पुढे भुजबळ म्हणाले की, ‘मुख्यमंत्री झालो नाही याची मला अजिबात खंत वाटत नाही. स्वतः बाळासाहेब बोलले होते की, जर भुजबळ गेले नसते तर मुख्यमंत्री झाले नसते. त्यामुळे अर्थात बाळासाहेब म्हणाले म्हणून मी मुख्यमंत्री झालोही असतो. कारण १९८५ साली विधानसभेची निवडणूक शिवसेनेचा मी एकटाच निवडून आलो होतो, सर्व जण पराभूत झाले होते. त्यामुळे महापौर, आमदार आणि ऑल इंडिया मेअर कौउन्सिलचा अध्यक्ष पण मी होतो. हा सगळा इतिहास झाला.
पुढे भुजबळ म्हणाले की, बाळासाहेबांनी सुद्धा माझ्यावर खूप प्रेम केलं. त्यांनी आमदार असतानाही मला नगरसेवक पदासाठी उभं केलं. त्यानंतर त्यांनी मला महापौर पद दिलं. त्यामुळे ते संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही’, असे भुजबळ म्हणाले.