मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून ह्मविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांचे घोटाळे धापा नी किरीट सोमय्या यांनी बाहेर काढले होते. त्यात आता पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच नेते आणि मंत्री हसन मुश्रीफांच्या त्यांचा मुलाकग तथा गोकुळ दूध संघाचे संचालक नावेद मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोपा लगावला होता.
पुढे अनिल परब त्यांच्या कारवाई संदर्भात बोलताना सोमय्या म्हणाल की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार हे सेटिंगबाजांचं सरकार आहे. तसेच हे दोघेजण मिळून मंत्री अनिल परब यांना वाचवत आहेत. बेनामी संपत्ती होती त्यात भुजबळ राहत होते. आताही राहतात हा बंगला कोणाचा आहे? मी म्हणालो ना, चार दिन की चांदनी आहे. त्याचा आनंद थोडा दिवस घेऊ द्या. गेली पाच वर्ष जे त्यांनी सहन केलंय त्यामुळे ते आनंद व्यक्त करत असतील. मला शेरोशायरीत जायचं नाही. कारण ही लूट आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मंत्री आणि सरकार शेरोशायरी करत असतील पण सोमय्या महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला जबाबदार आहे. त्यामुळे भुजबळांचे १२० कोटींची चोरी आम्ही पकडून दिली, असं सांगतानाच शेरोशायरी नाही, 120 कोटी कुठून आले ते सांगा? राजमहलमध्ये राहता तो राजमहल कुणाचा ते सांगा?, असा सवालही त्यांनी केला.