मुंबई | मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी होती असताना आद्यपही लोकल प्रवासाला सामान्य नागरिकांना परवानगी देण्यात आलेली नाही याच मुद्द्यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यातच आज भाजपतर्फे मुंबईत रेल भरो आंदोलन करण्यात आले. तसेच मनसेने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी लोकल प्रवासाबाबत महत्वाची माहिती दिली असून दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाबाबत दोन तर तीन दिवसात निर्णय घेतला जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आदित्य ठाकरे म्हणाले कि, रेल्वे प्रवासाबाबत दोन ते तीन आठवडे झाली चर्चा होत आहे. यासह सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या दोन डोस लसींचे घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवासाची मुभा देण्याबाबत तसेच अनेक गोष्टीबाबत राज्य सरकारबरोबर चर्चा करणार आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.