एच सुदर्शन
बार्शी : ऐन उन्हाळ्यात महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने आधीच हैराण असलेल्या ग्राहकांना महावितरणने शॉक दिला असून मार्च-एप्रिल महिन्याचे वीज बिल ग्राहकांना वेळेत पोहोच न करता बिल भरण्याच्या अंतिम दिनांकास बिलांचे वाटप करण्यात आले आहे. बीज बिल भरण्याच्या अंतिम दिनांका नंतर प्रत्येक ग्राहकाकडून महावितरण दंड घेते. महावितरणच्या चुकीच्या कारभारामुळे ग्राहकांना आर्थिक दंडात्मक शॉक सहन करावा लागणार आहे.
या बाबत गजानन देशपांडे यांनी आवाज उठवत महावितरण कडे लेखी तक्रार केली आहे. यावेळी महावितरणने कानावर हात ठेवत वीज बिल वाटप करणाऱ्या ठेकेदारकडे बोट दाखवले आहे. संमधीत ठेकेदारांची चौकशी करून दंडात्मक रक्कम ग्राहकांकडून वसूल न करता त्या ठेकेदाराकडून ती वसूल करावी अशी मागणी देशपांडे यांनी ‘ग्लोबल न्युज मराठी’शी बोलताना केली आहे. हजारो ग्राहक वीज बिल भरताना किरकोळ दंडात्मक रक्कम आहे म्हणून दुर्लक्ष करत महावितरणला प्रत्येक महिना लाखो रुपयांचा दंड वसूल करत असून या बाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
टीप: शासकीय अधिकारी जुमानत नाहीत, आपले काम करत नाहीत, अडवणूक होते, अन्याय होत आहे, तुमचा आवाज दडपला जातोय आता शांत बसू नका.
आपला आवाज