भारताने शेवटपर्यंत झुंज दिली हे पाहून खूप चांगले वाटले – नरेंद्र मोदी
संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारताची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम होते. याचा आम्हाला अभिमान आहे. विजय आणि पराभव हा आयुष्याचा एक भाग असतो. भारतीय संघाला भविष्यासाठी शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बुधवारी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली. या पराभवामुळे भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. यामुळे तमाम भारतीयांची मोठी निराशा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील याला अपवाद ठरले नाहीत.
या सामन्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विटर आपल्या भावना व्यक्त केल्या. या सामन्याचा निकाल निराशाजनक आहे. मात्र, भारताने शेवटपर्यंत झुंज दिली हे पाहून खूप चांगले वाटले. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारताची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम होते. याचा आम्हाला अभिमान आहे. विजय आणि पराभव हा आयुष्याचा एक भाग असतो. भारतीय संघाला भविष्यासाठी शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.