भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हातामध्ये हातोडा घेऊन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. सोमय्या म्हणाले, की ‘घोटाळेबाज सरकारचा हातात हातोडा घेऊन सत्यानाश करणार आहे. उद्धव ठाकरे काय म्हणतात, अनधिकृत बांधकाम करणार. हे काय मुख्यमंत्री आहेत. जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे.
हा साडेबारा कोटी जनतेचा हातोडा आहे. हा आमचा सत्याग्रह आहे, अशा शब्दांत सोमय्या यांनी सरकारवर निशाणा साधला. परबला आज ना उद्या मंत्रीमंडळातून बाहेर काढावं लागणार आहे. दोन्ही अनिल परबांचे रिसोर्ट आहेत. मग एकावरच कारवाई आणि दुसऱ्यावर का नाही? असा सवाल सोमय्या यांनी केला. सोमय्या पुढे म्हणाले, हे अनधिकृत बांधकामं तोडावं लागणार आहे. ठाकरे पोलिसांना नाचवतात पण पोलीस जनतेचे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे माफिया आणि वसुलीवाले आहेत अशी टीका त्यांनी केली होती.
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, की ‘हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे. उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हातपाय त्यांनी कधीच तोडले असते, मात्र मला सुरक्षा आहे म्हणून मी वाचलो. माझ्या मागे जनता आहे, मोदी सरकारची झेड कॅटेगिरी सुरक्षा आहे. मी पुरावे दिलेत आणि मलाच जेलमध्ये टाकू म्हणतात. नवाब मलिक गेलेत, मात्र डर्टी डझनवर अजून कारवाई होणार आहे. चोरी लबाडी पकडली तर हे असं वागतात. हे चालू देणार नाही. माफियागिरी दाऊदगिरी महाराष्ट्रात चालू देणार नाही’. असंही ते म्हणाले.