ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा भारतीय जनता पक्षच नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग येथे पोहोचली आहे. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्ताधारी पक्षातील मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी अब्दुल सत्तार, नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र आणि दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला.
मंत्री दीपक केसरकर यांच्यावर बोलताना अंधारे म्हणाल्या की, म्हणाल्या की, दीपकभाऊ खूप चतुर कावळा, गोडबोल्या आणि साखर झेल्या असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. गोड गोड बोलणाऱ्यांच्या चेहऱ्यांच्या पाठीमागे क्रूर चेहरा असतो असाही हल्लाबोल त्यांनी त्यांच्यावर केला. तसेच यामहाप्रबोधन यात्रेत भाषण सुरु झाल्यापासून त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर अंधारे यांनी टीकास्त्र सोडले.
या सभेत त्यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना विधानसभेतील त्यांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील झालेल्या संवादाचा व्हिडीओच लावला. काँग्रेसमधून नारायण राणे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी फक्त भुंकायचंच काम केले आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपचे आता पुन्हा युद्ध रंगणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
नारायण राणे, दीपक केसरकर यांच्याबरोबरच त्यांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याबाबत बोलताना अंधारे यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली. राणे पितापुत्र जेव्हा महिलांबद्दल वाईट बोलतात त्यावेळी भाजपला हे दिसत नाही का असा सवल त्यांनी यावेळी उपस्थित केला