Thursday, November 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी सोडावी, आपल्या काळात कॉंग्रेस पक्षाच्या जागा कमी कशा आल्या याची काळजी करावी – विखेंचा सल्ला

by धिरज करळे
June 23, 2019
in महाराष्ट्र
0
पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी सोडावी, आपल्या काळात कॉंग्रेस पक्षाच्या जागा कमी कशा आल्या याची काळजी करावी – विखेंचा सल्ला

अहमदनगर |  कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर विखे पाटील यांनी टीकास्त्र सोडले. पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी सोडावी, ज्याच्यामुळे कॉग्रेस पक्षाची अधोगती झाली त्याची काळजी करावी. ते मुख्यमंत्री असताना राज्यात 82 वरून 42 जागा आल्या. तसेच माझ्या विरोधातील याचिका न्यायालयात असल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचे मत विखेंनी मांडले.

गृहनिर्माण पदी वर्णी लागल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी या मुळगावी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांचे दर्शन घेतले आणि जनतेशी संवाद साधला.

पुढे बोलताना विखे म्हणाले की, माझ्यावर पक्षाने विश्वास व्यक्त करत कँबीनेट पद दिले आहे. पंतप्रधान, पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांनी जो विश्वास दाखवला त्यास पात्र राहाण्याचा माझा प्रयत्न राहील .

चव्हाण यांनी अशी केली होती टीका

दरम्यान, काग्रेस सोडून भाजपात गेलेले राधाकृष्ण विखे पाटील व जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली मंत्रिपदे ही घटनाविरोधी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पक्षांतर संदर्भात 2003 मध्ये केलेल्या घटना दुरुस्तीचे उल्लंघन झाले असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना काँग्रेसतून भाजापात आलेले विखे व राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले क्षीरसागर यांना मंत्रिपदे देण्यात आली. त्यांना अशाप्रकारे पक्षांतर करून मंत्रीपदे देणे हा लाच देण्याचा प्रकार असून हा राजकीय भ्रष्टाचार खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: काँग्रेसपृथ्वीराज चव्हाणभाजपमंत्रीराधाकृष्ण विखे पाटील
ADVERTISEMENT
Next Post
वधू वरांच्या संख्येत असणारी मोठी तफावत ही चिंतेची बाब: खा. रणजितसिंह निंबाळकर

वधू वरांच्या संख्येत असणारी मोठी तफावत ही चिंतेची बाब: खा. रणजितसिंह निंबाळकर

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group